Wednesday, May 23, 2012

तुमसे मिलकर.....ऐसा लगा तुमसे मिलकर.....

नेहमी प्रमाणे संध्याकाळी शिवाजी पार्क ला चक्कर मारायला बाहेर पडलो. कानात हेडफोन वर  रेडियो चालू होता RJ मस्त मस्त बोलत होते एकसे एक गाणी चालू होती. थोडक्यात माझा नित्य क्रम चालू होता. चालता चालता  अचानक  वीज  चमकावी  तसा  माझा  मूड  अचानक  बदलला.  अचानक  खूप विचित्र आणि घुसमटायला लागलं. तसा मी मोकळ्या हवेवर फिरत होतो तरी खूप अस्वस्थ झालो होतो. कानात इतका वेळ आनंद देणार म्युझिक अचानक टोचर वाटू लागलं.  क्षणात  कानातून  हेडफोन  काढले आणि जवळच्या बाकावर बसलो. जरा स्वस्थ बसलो. थोडा श्वास शांत झाला तसे मला जरा ठीक वाटू लागलं तरी पूर्ण बरे वाटत नव्हत.  वाटल मला काही तरी बोलायचं आहे पण काय ?कुणाशी? काहीही  कळत नव्हत. पटकन मोबाईल हातात घेतला आणि म्हणाल आईशी बोलाव फोन लावला तोच वाटल उगाच तिला हे सगळ सांगितलं आणि  ती  तिकडे  काळजी  करायला  लागली  तर.... म्हणून  बोलायच्या  आतच फोन कट केला. मग विचार आला अरे मग  मित्र  कधी  कामी येणार  म्हणून  झरझर  मित्रांना फोन लावले आश्चर्य म्हणजे कुणी हि फोन उचलला नाही. एकाचा लागला  तर तो एका पार्टी मध्ये होता मनात म्हणल च्यायला तो तिकडे मजा करायला गेलाय आणि मी काय सांगू त्याला की मला काही तरी अस्वस्थ होतंय काही तरी बोलायचं आहे पण काय ते कळत नाहीये अस काही तरी बोलून त्याचा पार्टी मूड spoil करण्या पेक्षा फोन ठेवला. वाटल एखादी girlfriend  तरी हवी होती किमान तिला तरी सांगत आल असत. पण आत्ता जर तर च्या गोष्टी करून काही उपयोग नव्हता.
शेवटी काय मला काहीतरी होतंय काहीतरी बोलावस वाटतंय याच उत्तर माझ मलाच शोधायला लागणार आहे. मुंबई मध्ये या आधी कधीच मला अस झाल नव्हत. शेवटी मी मनात म्हणाले हे मुंबई माते तूच यातून रस्ता दाखव. आणि तिने तो दाखवला मला डोळ्या समोर एक छोटासा रस्ता आत जाताना दिसला अचानक पाउले तिकडे वळली. तो रस्ता थेट दादर च्या समुद्र कडे जात होता. Hardly २ मिनिटे चाललो आणि समुद्रावर आलो आणि सुदैवाने कुठल्याही प्रेमी युगुलांनी आसरा न घेतलेला एक दगड मला दिसला त्यावर जाऊन बसलो. समोर काळोख पसरला होता. समुद्राच्या भरतीची वेळ होती लाटा एकामागून एक उसळत होत्या. समोरच bandra -worli sea link ची कमान दिव्यांनी उजळून गेली होती. समुद्राच्या लाटा एका मागून एक पुढचा टप्पा गाठत होत्या. मनात विचार आला हा समुद्र गेली कित्तेक वर्ष इथेच आहे त्याच्या आजू बाजुच जग किती बदलत राहत तरी तो आहे तसाच तटस्थ त्याच कार्य करत तिथेच आहे. मनात विचार आला मला जमेल का असे स्वतच्या तत्वांशी, स्वप्नांशी, अस्तित्वाशी तटस्थ राहाण. आयुष्य कस असावं समुद्रा सारख आपल्या उद्देशाशी तटस्थ कि आजूबाजूच्या जागा सारख वेळेनुसार, गरजेनुसार बदलणार.
चेहऱ्यावर अचानक पाण्याचे तुषार उडले लाट अजून जवळ आली होती. ओहोटीच्या वेळेला अगदी दूर शांत दिसणारी लाट भरतीच्या वेळेला आपल्या जवळ येऊन तिच्या अस्तित्वाने आनंद देते.किंवा सुनामी च्या वेळेला समोरच्याचा थरकाप उडवून देते. केवळ सातत्याच्या प्रयत्नांनी एक न एक दिवस जग तुमची दाखल घेतच न यार..... 
कसलं भारी आणि हलक वाटतंय आता मला अस्वस्थता नाही की अशांतता नाही. मला जे  बोलायचं होते ते हेच आणि ते दुसर्या कुणाशी नाही माझ्याशीच. पण सरळ कळेल तर आयुष्य काय? आणि जर का ते इतक्या सहज काळाल असत तर कायमच लक्षात थोडाच राहील असत.  आता मी बोलतोय माझ्याशीच अगदी विवेकानादानी सांगितल्या प्रमाणे जगातील सर्वात उत्तम माणसाशी म्हणजे माझ्या स्वताशीच बोलतोय. मी का आलोय इकडे? काय करायचं मला ? मला जे मिळवायचं आहे त्याच्या साठी प्रयत्न करतोय का मी ? करत असलो तर किती सातत्य आहे त्यात ?तितके प्रयत्न sufficient  आहेत का? मी प्रश्न विचारात होतो आणि कुठलाही आडपडदा न ठेवता उत्तरे देत होतो. प्रत्येक उत्तरागणिक मला स्वताला खूप भारी वाटत होते. स्वताला appreciate करण्यात, cricise करण्यात इतकाच काय confess करण्यात जे काही सुख असत ना ते षड्ब्दात मांडता न येण्यासारखं असत. असा मस्त प्रश्नौत्तारांचा तास मी केला.
आता मी समुद्रा कडे पात फिरवून शांत मनाने चालतोय. कारण मला जे बोलायचं होतो ते मी बोललो होतो त्याची उत्तरे ही मला मिळाली होती कारण कुणी तिसरा येऊन माझ आयुष्य सुंदर करणार नाही हे मला पक्क कळून चुकलंय So  अचानक काही तरी खजिना सापडावा अशा आनंदात मी घरी चाललो आहे. आनंद तर होणार च न जगातल्या सगळ्यात भारी माणसाला भेटून चाललो होतो ना.....

No comments:

Post a Comment